शिवशाहीत दुष्काळामुळे गावे ओसाड पडली होती. लोक उपासमारीने मरत होते किंबहुना व्याकुळ होउन जीव देत होते,जनावरे टाचा घासून मरत होती.नियतीने हा असा पसारा बाल शिवाजी महाराजांसमोर वयाच्या १२व्या वर्षी मांडला होता.
तीन वर्ष महाराजांनी या परिस्थितीचा अभ्यास करून समजून घेण्यासाठी वेळ घेतला.हा दुष्काळ कायम स्वरूपी निवारण होण्यासाठी दूरगामी प्रभावी ठरेल अशी अर्थनीती तयार केली आणि त्यानुसार महाराजांनी "स्वराज्य" नावाची २३वर्षाच्या दुष्काळावर मात करत उभी राहणारी आशियातीलच नह्वे तर जगातली सर्वात शक्तिमान अशी अर्थव्यवस्था निर्माण केली.
महाराष्ट्रातील लोकसंख्या आणि घनता याचा विचार करता महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील एक तरी माणूस स्वराज्याच्या सेवेत होता आणि स्वराज्यात सहसा शिपायाचा पगार १०० होन आजच्या चलनानुसार म्हणजे ६०,००० रूपये होता तर अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांचा वार्षिक पगार ६०० कोटी होता.आज जगातील सर्वात विकसित अशा अमेरिकेतसुद्धा व्यवस्थापकाला वार्षिक ६०० कोटीचे पॅकेज मिळत असेल तर आम्हाला दाखवा ???
म्हणजे कळेल,महाराजांनी या महाराष्ट्राला किती श्रीमंत केले होते.शिवाजी महाराजांची ही आर्थिक क्रांती जर आमच्या पोरांना अभ्यासक्रमात शाळा-महाविद्यालयात शिकवली तर आमची पोरं अमेरिकन कंपनी किंवा एमएनसी मधे काम करण्याचे स्वप्न न बाळगता त्या कंपन्या खरेदी करण्याचा सरळ सपाटा लावतील.
पण गरज आहे महाराजांना लढाई अन् कोणत्या धर्मात बांधून न ठेवता त्यांचं अर्थशात्र पोरांपर्यंत पोहचवण्याची..
जय जिजाऊ जय शिवराय
No comments:
Post a Comment