छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचा व कारकीर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता काही गोष्टी समोर येतात.
शौर्य,पराक्रम,शारीरिक सक्षमता,ध्येयवाद,कुशल संघटन,कडक व नियोजनबद्ध प्रशासन,मुत्सद्दीपणा,धाडस,द्रष्टेपणा..
असे उच्च कोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटलेले दिसतात.
छत्रपती शिवरायांनी
- बालपणी,तरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी स्वत: कष्ट घेतले..
- पराक्रमासाठी शस्त्रांचा अभ्यास केला..
- साध्या-भोळ्या मावळ्यांचे संघटन करून त्यांच्यामध्ये निष्ठा व ध्येयवाद जागृत केला..
- स्वत: निर्णय घेऊन स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वत:ला घट्टपणे बांधुन घेतले..
- महत्त्वाचे गड-किल्ले जिंकले,नवे निर्माण केले..
- योग्य त्या वेळी आक्रमण किंवा गरज पडेल त्या वेळी तह हे सुत्र कमालीच्या हुशारीने वापरून अनेक शत्रूंना नामोहरम केले,तसेच फितुरी,दगाबाजी,अंतर्गत कलहाचाही सामना केला..
- आक्रमणाच्या वेळी शिवतंत्राचा (गनिमी कावा) चातुर्याने वापर केला..
- सामान्य रयतेची व्यवस्था, शेतकर्यांची व्यवस्था,लढवय्या शुर सरदारांची व्यवस्था,सर्व धार्मिक स्थानांची व्यवस्था अशा अनेक व्यवस्था लावुन दिल्या..
- सर्वांत महत्त्वाचे म्हणजे छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून स्वराज्याच्या लोकशाही राज्यकारभाराची परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली..
- राजभाषा (मराठी) विकसित करण्याचा गांभीर्यपूर्वक प्रयत्न केला;विविध कलांना राजाश्रय दिला..
- खचलेल्या,पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा,पराक्रमाचा,स्वराज्य निष्ठेचा हुंकार जागृत केला..
या सर्व गोष्टी त्यांनी साध्य केल्या अवघ्या ५० वर्षांच्या आयुष्यात !
सतराव्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमान,ती स्वराज्यनिष्ठा आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते..
|| जय शिवराय ||